24 November 2010

साधक संजीवनी - परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास कृत भगवद्‌गीतेवरील विस्तृत टीका -

साधक संजीवनी -
परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास कृत भगवद्‌गीतेवरील विस्तृत टीका -


श्रीमद् भगवद्‌गीता एक विलक्षण ग्रंथ आहे. त्याचे वैलक्षण म्हणजे परब्रह्म परमात्म्याने अवतार घेऊन स्वमुखाने मानवास मोक्षस्थिती अनुभविण्याचा उपदेश केला आहे. मोक्षप्राप्तीचे मुख्यतः तीन राजमार्ग म्हटले आहेत त्यास प्रस्थानत्रयी म्हणतात. गीता, उपनिषद् आणि ब्रह्मसूत्र हे तीन प्रस्थान. असे म्हणतात की उपनिषदांचे श्रवण करावे, ब्रह्मसूत्रांचे मनन करावे आणि भगवद्‌गीतेचे निदिध्यासन करीत ब्रह्माचा अनुभव घ्यावा.

भगवद्‌गीतेवर अनेकानेक भाष्ये आहेत. "साधक संजीवनी" ही भगवद्‌गीतेवरील परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास यांची टीका. स्वामी म्हणतात - भगवद्‌गीता असा विलक्षण ग्रंथ आहे की ज्याचा कोणाला पार लागू शकला नाही, पार लागू शकत नाही आणि पार लागू शकतच नाही. याचे नित्य अध्ययन मनन केल्यास नित्य नवीन भाव प्रकट होत राहतात. गीतेत जितका भाव भरला आहे, तितका बुद्धीत येत नाही. जितका बुद्धीत येतो, तितका मनात येत नाही, जितका मनात येतो तितका सांगण्यात येत नाही. गीता असीम आहे परंतु तिची टीका सीमितच असते. स्वामी पुढे म्हणतात मला आधी निर्गुणाचे प्राधान्य वाटायचे, पण त्यात सर्वच बाबींचे योग्य समाधान होत नाही. परंतु सगुण प्रधान मानल्याने कोणताही संशय शिल्लक राहात नाही. समग्र सगुणातच आहे, निर्गुणात नाही. पाहूया तर असा अनुभव घेतलेले श्रेष्ठ संत स्वामी रामसुखदास आपल्या टीकेत काय म्हणतात.

स्वामींचा आग्रह आहे साधकांनी स्वतःचा कोणताही आग्रह न ठेवता ही टीका वाचावी आणि यावर सखोल विचार करावा म्हणजे वास्तविक तत्त्व त्यांना समजून येईल आणि जी गोष्ट टीकेत आली नसेल, तीही समजून येईल.

DOWNLOAD [Right click to save]

अध्याय १ ला
अध्याय २ रा
अध्याय ३ रा
अध्याय ४ था
अध्याय ५ वा
अध्याय ६ वा
अध्याय ७ वा
अध्याय ८ वा
अध्याय ९ वा
अध्याय १० वा
अध्याय ११ वा
अध्याय १२ वा
अध्याय १३ वा
अध्याय १४ वा
अध्याय १५ वा
अध्याय १६ वा
अध्याय १७ वा
अध्याय १८ वा
***

No comments: